Maharashtra Government Scheme मुलीचा जन्म झाला असेल, तर सरकारकडून पालकांना 50 हजार रुपये मिळतात. यासोबतच या योजनेमध्ये अपघात विमा सुद्धा मिळत असतो. मुलींची प्रगती व्हावी याकरता सरकारने अनेक सरकारी योजना सुरू केलेल्या आहेत. म्हणजेच मुलीच्या जन्मापासून तर शिक्षणापर्यंतचा जोही खर्च येत असेल तो सरकार उचलत असतो अशीच एक महाराष्ट्र सरकारने सुरू केलेली योजना मुलीच्या जन्मावर 50 हजार रुपये देते.
1एप्रिल 2016 पासून महाराष्ट्र शासनाने ‘माझी कन्या भाग्यश्री योजना’ सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत मुलींना कोणी कमी लेखू नाही याकरता सरकार प्रोत्साहन देते. मुलींच्या आकडेवारी मध्ये सुधारणा व मुलींना प्रोत्साहन देण्याकरता ही योजना सरकारने सुरू केलेली आहे. एखाद्या कुटुंबामध्ये दोन मुली असतील तर त्यांना सुद्धा या योजनेचा लाभ दिला जातो. आता बघू की या योजनेचा अर्ज कसा करायचा? आणि कोण कोण या योजने करता पात्र असू शकतात?.
कोणाला मिळेल फायदा? येथे क्लिक करा
कोण करू शकतो अर्ज येथे क्लीक करा
अर्ज कसा करायचा? फॉर्म कसा भरायचा याची माहिती पुढील प्रमाणे:
अर्ज कसा भरायचा?
- सर्वप्रथम आपण महाराष्ट्र सरकारच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
- वेबसाईटवर गेल्यानंतर माझी कन्या भाग्यश्री योजनेचा फॉर्म डाऊनलोड करून घ्या.
- अर्ज डाऊनलोड झाल्यानंतर तो अर्ज पूर्ण व्यवस्थित भरा.
- अर्ज भरल्यानंतर त्याला आवश्यक असणारी कागदपत्रे वरील लिंक मध्ये दिलेली आहेत ती अर्जासोबत जोडून महिला व बालकल्याण विकास कार्यालयामध्ये अर्ज सादर करायचा आहे.