Shivneri Fort Information in Marathi शिवनेरी किल्ला

शिवनेरी Shivneri Fort Information in Marathi किल्याला महाराष्ट्राच्या इतिहासात महत्त्वाचे स्थान आहे कारण हा किल्ला म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान आहे. शिवनेरी किल्ल्यावर ते आता अर्ध्या पर्यंत पोचतात. त्यामुळे आता फारसे अवघड राहिलेलं नाहीये शकतात. ही वाहनांच्या पार्किंगसाठी जागा आहे. त्यामुळे तिला प्रवास करावा लागतो. जुन्नर ही शकराजा नहपानाची राजधानी होती.

Shivneri Fort Information in Marathi शिवनेरी किल्ला

राजा गौतमीपुत्र सातकर्णी याने शकांचा नाश केला आणि जुन्नर व येथील सर्व परिसरावर आपले वर्चस्व प्रस्थापित केले. इथून किल्ल्याच्या पायऱ्या सुरुवात होते . नाणेघाट हा पुरातन व्यापारी मार्ग या मार्गावरून फार मोठा प्रमाणावर वाहतूक चालत असे. यावर नजर ठेवण्यासाठी या मार्गावरील दुर्गांची निर्मीती करण्यात आली तुम्ही बघू शकता. समोरच आपल्याला पहिला दरवाजा दिसतोय किल्ल्याचा मुख्य दरवाजा हे शिवनेरी चालुक्य व राष्ट्रकूट या राजवटींच्या सत्तेखाली होती . छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म किल्ल्यावर झाला. तो म्हणजे शिवनेरी किल्ला 19 फेब्रुवारी, 1630 शिवनेरी किल्ल्यावर रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म झाला.

किल्ल्याविषयी माहिती Shivneri Fort Information in Marathi

शिवनेरी हा किल्ला चारही बाजूंनी कठीण चढाव असून, त्याला जिंकावयास कठीण असलेला बालेकिल्ला आहे. किल्ल्यावर शिवाई देवीचे छोटे मंदिर व जिजाबाई व बाल-शिवाजी यांच्या प्रतिमा आहेत. या किल्ल्याच्या आकार शंकराच्या पिंडीसारखा आहे. शिवनेरी किल्ला जुन्नर शहरात आहे. जुन्नर मध्ये शिरतानांच शिवनेरीचे दर्शन होते. किल्ला तसा फार मोठा नाही. सन 1673 मध्ये ईस्ट इंडिया कंपनीतील डॉक्टर जॉन फ्रायर याने या किल्ल्याला भेट दिली होती. त्याने आपल्या साधनग्रंधात या किल्ल्यावर हजार कुटुंबांना सात वर्षे पुरेल एवढी शिधासामुग्री आहे असा उल्लेख केलेला आहे.

शिवनेरी किल्ल्याचा इतिहास Shivneri Fort Information in Marathi

शिवनेरी Shivneri हा किल्ला नगर इ.स.पूर्व काळापासून प्रसिद्ध आहे. ही शकराजा नहपानाची राजधानी होती. सातवाहन राजा गौतमीपुत्र सातकर्णी याने शंखाचा नाद केला आणि जुन्नर व येथील सर्व परिसरावर आपले वर्चस्व प्रस्थापित केले. नाणेघाट हा पुरातन व्यापारी मार्ग या मार्गावरून फार मोठ्या प्रमाणात वाहतूक चालत असे यावर नजर ठेवण्यासाठी या मार्गावरील दुर्गांची निर्मीती करण्यात आली होती.

See also  झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या मुलाचे पुढे काय झाले? Jhanshi Rani Laxmibai

सातवाहनांची सत्ता स्थिरावल्यानंतर त्यांनी येथे अनेक ठिकाणी लेणी खोदून ठेवली. सातवाहनांनंतर शिवनेरी चालुक्य व राष्ट्रकूट या राजवटींच्या सत्तेखाली होता. 1170 ते 1308 च्या सुमारास यादवांनी येथे आपले राज्य स्थापन केले आणि याच काळात शिवनेरीला गडाचे स्वरूप प्राप्त झाले. तुझा याने यादवांच्या काळात सेवेत असलेल्या स्थानिक कोळी सदरांचा पराभव करून किल्ला ताब्यात घेतला.

अशा प्रकारे किल्ला बहमनी राजवटीखाली आला. इ.स. 1470 मध्ये मलिकुलचा प्रतिनिधी मलिक मुहम्मद यांनी किल्ला नाके बंद करून पुन्हा सर केला. 1446 मध्ये मलिक मुहम्मद तिच्या वडिलांच्या मृत्यूनंतर निजामशाहीची स्थापना झाली. पुढे 1493 मध्ये इथली राजधानी गडावरून अहमदनगरला हलविण्यात आली. 1565 मध्ये सुलतान मूर्तीच्या निजाम ने आपला भाऊ कासिम याला या गडावर काय ठेवले होते.

यानंतर 1595 मध्ये किल्ला व जुन्नर प्रांतातील मालोजीराजे भोसले यांच्याकडे आला जिजाबाईंचे वडील जाधव राव यांच्या हत्येनंतर 1629 मध्ये जिजामाता गरोदर असताना शहाजी नेत्यांना पाचशे स्वार त्यांच्यासोबत देऊन रातोरात शिवनेरीवर नीले शिवनेरी गडावर श्रीभवानी माता शिवायला जिजाऊने नवस केला, जर आपल्याला पुत्र झाला तर तुझें नांव ठेवीन 1551 शुक्ल नाम संसरे फाल्गुन वद्य तृतीयाला शुक्रवारी सूर्यास्तानंतर शिवाजीराजे यांचा जन्म झाला. तारीख होती 19 फेब्रुवारी, 1630. शिवाजी सह जिजाबाईंनी 1632मध्ये गड सोडला आणि 1637 मध्ये किल्ला मोगलांच्या ताब्यात गेला.

इ.स. 1764 मध्ये माधवराव पेशवे यांनी प्रशासनात केलेल्या बदलाची परिणीती शिवनेरी आणि पुरंदर किल्ल्याचं कोळ्यांनी केलेल्या बंडात झाली. शिवनेरीवरील कोळ्यांना रामचंद्र शिवाजी माने याने कामावरून कमी केले होते. रामचंद्र माने याने 15 सप्टेंबर 1764 रोजी शनिवारवाड्यावर राघोबादादा यांस बंड मोडून काढणे अवघड जात असल्याबद्दलची माहिती पत्राद्वारे कळवली होती. महादेव कोळी समाज एकत्रित जमाव करून अचानक हल्ला करतात अश्याच प्रकारे गनिमी काव्याप्रमाणे त्यानी जीवधन, चावंड, हडसर यासारख्या किल्लांचा ताबा घेतला होता. नंतर पुढे शिवनेरीवरील उधो विश्वेश्वराचे धोरणांना विरोध करण्यासाठी बंड केले.

See also  Baji Pasalkar बाजी पासलकर

सन 1765 मध्ये महादेव कोळ्यांनी दुसरे बंड केले. या बंडाचे नेतृत्व जुन्नरच्या मावळतील देशमुख/नाईक संताजी शेळकंदे यांनी केले. या मध्ये त्यांनी शिवनेरीचा ताबा घेतला. हे बंड मोडून काढण्यासाठी पुण्याहून बारभाईंनी आणि सवाई माधवरावांनी उधो विश्वेश्वरच्या मदतीला गारद्यांना पाठवले. पुढे बंड मोडून काढले आणि महादेव कोळी सरदारांना शिक्षा करण्यात आली. संताजी मात्र पळून जाण्यात यशस्वी झाले. वारंवारं होणाऱ्या बंडामुळे पेशवे हैराण झाले. पुढे सन 1771 मध्ये नाना फडणीसांनी संताजी बरोबर तह केला आणि त्यांना सरदारकी बहाल केली आणि शिवनेरीवर पुन्हा कोळ्यांना सेवेत रुजू केले.

पेशवे काळात शिवनेरीचा उपयोग कैद्यांसाठी केला जात होता. शिवनेरी किल्ल्यावरील कैद्यांना काही आनंदाच्या प्रसंगी सोडूनदेखील देण्यात येत होते. 18 एप्रिल 1774 रोजी सवाई माधवराव यांचा जन्म झाला. या आनंदाप्रीत्यार्थ बारभाई मंडळाने शिवनेरी आणि नारायणगड यांवरील कैद्यांना सोडून देण्यात आले होते. अशी नोंद आहे. काळाच्या ओघात शिवनेरीवरील कैदखानाची पडझड होऊन गेली. सन 10 मे, 1818 मध्ये मेजर एल्ड्रिजनने शिवनेरी किल्ल्याला वेढा घातला. किल्लेदाराने काही काळ किल्ला लढवला. नंतर त्याने किल्ला सोडून हडसरच्या किल्ल्याचा किल्लेदाराकडे आश्रय घेतला अशी इतिहासात नोंद आहे.

कोळी चौथरा Koli Chauthara

शिवाजी महाराजांच्या पुणे परिसरातील कारवाया आदिलशाहीला खुपत होत्या. मोगलांना जरी त्या ठाऊक असल्या तरी अजून त्यांना त्याचा थेट उपसर्ग होत नव्हता. त्याच सुमाराला काही महादेव कोळी लोकांनी मोगलांविरुद्ध आघाडी उघडून जुन्नर व शिवनेरीचा ताबा घेतला. ह्यापूर्वी हा भाग निजामशाहीकडे होता. निजामशाही पडल्यानंतर सीमा भागाकडे आदिलशाहीचे व मोगलांचे थोडे दुर्लक्ष होत होते.

कदाचित ह्याचा फायदा घेऊन ह्या महादेव कोळ्यांनी त्या प्रांतावर अधिकार स्थापित केला. मोगलांनी ह्यावर लगेच उपाययोजना करण्यासाठी व महादेव कोळ्यांना परास्त करण्यासाठी एक भली मोठी फौज पाठवली. शिवनेरीला वेढा पडला व लवकरच महादेव कोळ्यांच्या नवख्या सैन्याने बलाढ्य मोगल सैन्यापुढे नांगी टाकली. सन 1500 साली महादेव कोळ्यांना जेरबंद करण्यात आले. त्यांचे अतोनात हाल करून नंतर माथ्यावरच्या एका चौथऱ्यावर त्यांचा शिरच्छेद करण्यात आला. ह्या नरसंहाराची आठवण म्हणून आज त्या चौथऱ्याला कोळी चौथरा म्हणतात.

See also  Sharad Pawar Family Tree शरद पवार वंशावळ

गडावर जाण्याच्या वाटा Shivneri Killa

गडावर जाण्याच्या दोन प्रमुख वाटा जुन्नर गावातूनच जातात. पुणेकरांना तसेच मुंबईकरांना एका दिवसात शिवनेरी पाहून घरी परतता येते.

साखळीची वाट 

या वाटेने गडावर यायचे झाल्यास जुन्नर शहरात शिरल्यानंतर नव्या बसस्टँड समोरील रस्त्याने छत्रपति शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ यावे. येथे चार रस्ते एकत्र मिळतात. डाव्या बाजूस जाणार्‍या रस्त्याने साधारणतः एक किलोमीटर गेल्यावर रस्त्याच्या उजव्या कडेला एक मंदिर लागते. मंदिरासमोरून जाणारी मळलेली पायवाट शिवनेरी किल्ल्याच्या एका कातळभिंतीपाशी घेऊन जाते. भिंतीला लावलेल्या साखळीच्या आणि कातळात खोदलेल्या पायर्‍यांच्या साह्याने वर पोहचता येते. ही वाट थोडी अवघड असून गडावर पोहचण्यास पाऊण तास लागतो.

सात दरवाज्यांची वाट 

छत्रपति शिवाजी महाराजांच्या Chhatrapati Shivaji Maharaj पुतळ्यापासून डाव्या बाजूच्या रस्त्याने चालत सुटल्यास डांबरी रस्ता आपणास गडाच्या पायर्‍यार्‍यांपाशी घेऊन जातो. या वाटेने गडावर येताना सात दरवाजे लागतात. पहिला महादरवाजा, दुसरा पीर दरवाजा, तिसरा परवानगीचा दरवाजा, चौथा हत्ती दरवाजा, पाचवा शिपाई दरवाजा, सहावा फाटक दरवाजा आणि सातवा कुलाबकर दरवाजा. या मार्गे किल्ल्यावर पोहचण्यासाठी दीड तास लागतो.

जुन्नरला येतांना माळशेज घाट पार केल्यावर 8 ते 9 किलोमीटर अशी एक पाटी रस्त्याच्या कडेला लावलेली दिसते. हा मार्ग गणेश खिंडीतून शिवनेरी किल्ल्यापर्यंत जातो. या मार्गाने गडावर पोहचण्यास मुंबईपासून एक दिवस लागतो. पुणे मधून नारायणगाव पर्यंत साधारणतः 75 कि.मी. अंतरावर पुणे-नाशिक मार्गे व त्यानंतर नारायणगाव-जुन्नर मार्गे 15 किमी आहे.

“तुम्हाला आमचा लेख शिवनेरी विषयी कसा वाटला, ते आम्हाला कमेंट करून सांगा.”

 

Leave a Comment