kharip pik vima 2021 – खरीप पिक विमा 2021 योजनेचा हप्ता लवकरच येणार शेतकऱ्यांच्या खात्यात…. केंद्र शासनाने 866 कोटीचा निधी केला मंजूर…..
शासन निर्णयानुसार पीक विमा कंपनीला राज्य शासनाचा हप्तासाठी ₹865.95 कोटी इतका निधी वितरीत करण्यास मंजुरी दिली आहे. त्याबद्दलचे परिपूर्ण अशी माहिती आपण या पोस्ट माध्यमातून देण्याचा प्रयत्न करणार आहोत.
राज्यात शेतकऱ्यांच्या पिकांना होणाऱ्या विविध प्रकारच्या हवामान धोक्यामूळे शेतकऱ्यांचे नुकसान होते आणि याच धोक्यापासून आर्थिक नुकसान टाळून शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य अबाधित राखण्यासाठी राज्यामध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजना राबविण्यात येते. 2021 मध्ये अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे
या नुकसानीच्या भरपाईसाठी अनेक शेतकऱ्यांनी क्लेम देखील केलेले आहेत. हे नुकसान भरपाईचे दावे निकाली काढण्यासाठी देखील विमा कंपनीला निधी असलेली गरज व विमा कंपनीची मागणी विचारात घेता सन 2021 च्या खरीप पीक विमा योजनेसाठी निधी वितरित करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.
नवीन पिक विमा योजना राबवित असताना,
मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आलेले आहे. कलेक्टरच्या माध्यमातून अधीसुचना काढलेल्या जिल्ह्यांना 25% याच प्रमाणे आपण पाहिले तर याच नवीन याच मार्गदर्शक सूचनांप्रमाणे नवीन निधी मंजूर केलेला आहे. त्यांच्या 80% च्या 50 % हा पहिल्या हप्त्यामध्ये राज्य शासनाच्या माध्यमातून वाटप करण्यात आलेला होता आणि वाटप झाल्यानंतरच केंद्र शासनाचा आणि राज्य शासनाचा निधी मिळवून दिवाळीपूर्वी 25% पिक विम्याचे वाटप करण्यात आले होते.
तसेच त्यांचा क्लेम पास झालेला होता, त्यांचा सुद्धा पिक विमा चा निधी वाटप करण्यात आला होता. परंतु तो पिक विमा अतिशय तुडका होता, त्यामुळे आता सर्वांना प्रतीक्षा लागली होती ती म्हणजे सरासरी उत्पादन करण्याची, उत्पन्नाचे, अंतिम आकडेवारी जाहीर होण्याची.
मित्रांनो, ही आकडेवारी जाहीर झाल्यानंतर सुद्धा आपण जर पाहिलं तर ज्या शेतकऱ्यांना 25% पिक विमा वाटप झाला होता. या ठिकाणी प्रतीक्षा होती, ती राज्य शासनाच्या माध्यमातून केंद्र शासनाच्या माध्यमातून पिक विमा कंपन्यांना निधी वितरित करण्याची. कारण पिक विमा कंपन्यांकडून निधी उपलब्ध झाल्यानंतरच या विम्याचे वाटप जातील, अशा प्रकारे सांगितले होतं. आपण जर पाहिले तर प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना अद्याप देखील बर्याच मोठ्या प्रमाणात पीक विमा वाटप बाकी आहे. निधी आल्यानंतर तो पिक विमा वाटप होईल.
अशा प्रकारची प्रसिद्धी पत्रक काढून अशा प्रकारची माहिती दिली जात होती. मित्रांनो या सर्वांचे पार्श्वभूमीवर जर आपण पाहिलं तर केंद्र शासनाने नवीन निर्गमित केलेल्या सूचनांनुसार 31 मार्च 2022 पूर्वी या आर्थिक वर्षामध्ये तो पिक विमा कंपन्यांसाठी उर्वरित 50% हा हप्ता आहे. हा वितरित करणे आवश्यक होते आणि राज्य सरकार वितरित केल्या नंतर या समरूप केंद्र शासनाचा हप्ता देखील राज्य शासनाला दिला जातो आणि या सर्वांच्या पार्श्वभूमीवर तयार केलेल्या मागणीचा विचार करता या पिक विमा योजना 2021-22 करिता 65.95 कोटी एवढा निधी वितरित करण्यासाठी शासन निर्णय घेऊन याठिकाणी मंजुरी देण्यात आलेली आहे.
यांच्या संदर्भातील अहवाल 2022 रोजीचा शासन निर्णय आपण पाहू शकता. प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत खरीप हंगाम 2019 पिक विमा हप्ता अनुदानापोटी राज्य शासन 865.95 कोटी इतकी रक्कम अदा करण्यासाठी वितरीत करण्याबाबत करण्याचा प्रस्ताव अद्याप माहिती पाहू शकता.
29 जून 2020 रोजीच्या शासन निर्णयानुसार महाराष्ट्रामध्ये सामाजिक विमा कंपन्यांच्या माध्यमातून पिक विमा योजना ही 3 वर्षांकरिता मंजुरी देण्यात आलेली आहे. या केंद्र शासनाच्या सुधारित मार्गदर्शक सूचनांनुसार 31 मार्च 2022 पर्यंत कंपन्यांना राज्य शासनाच्या आयुष्याची दुसरी रक्कम वितरीत करणं गरजेचं होतं आणि याच्यासाठी आयुक्तालयाच्या स्तरावर केलेल्या मागणीचा विचार करणार आणि महत्त्वपूर्ण शासन निर्णय घेण्यात आलेला आहे.
भारतीय कृषी विमा कंपनीने सादर केलेली मागणी कृषी आयुक्तलयाची शिफारस आणि केंद्र शासनाच्या सुधारित मार्गदर्शक सूचना मधील मुद्दा क्रमांक 13.1.11 या बाबींचा विचार करता प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप हंगाम 2019 साठी उर्वरित राज्य हिस्सा पिक विमा हप्ता अनुदान भारतीय कृषी विमा कंपनी, बजाज आलियांज जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड, भारती ऍक्सा जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड, रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड व एचडीएफसी इर्गो जनरल इ. कंपनी लिमिटेड या पाच विमा कंपन्यांना अदा करण्यासाठी भारतीय कृषी विमा कंपनी इस रुपये 865,95,58,459/- इतका निधी मार्गदर्शक सूचना मधील मुद्दा क्रमांक 13.1.5 नुसार वितरित करण्यास शासनाची मान्यता देण्यात येत आहे.
सदरची ही रक्कम खरीप हंगाम 2019 करिता वितरित करण्यात येत असून त्याचा कायदा आता शेतकरी बांधवांना होणार आहे. पीक विमा कंपनीला निधी मिळाल्यानंतर निधी उपलब्ध झाल्यानंतर शेतकऱ्यांना पीक विमा वाटप सुरू होणार आहे. सदर ठिकाणी शेतकऱ्यांनी आंदोलन केल्यानंतर, निदर्शने केल्यानंतर कृषी विभागाच्या माध्यमातून पाठपुरावा केल्यानंतर प्रत्येक वेळी उत्तर दिले जात होते.
तर मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली, ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व इतरांनाही शेअर करा.